LIVE -निकाल गडचिरोली-चिमूर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  गडचिरोली-चिमूर
www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली/चिमूर

संध्याकाळी 6: 36वाजता अपडेट अशोक नेते 2 लाख 36 हजार 540 मतांनी विजयी

सकाळी 3:00 वाजता अपडेट भाजपचे अशोक नेते विजयी

सकाळी 10:00 वाजताअपडेट गडचिरोली-चिमूर - अशोक नेते आघाडीवर

मतदारसंघ : गडचिरोली-चिमूर

मतदान दिनांक : १० एप्रिल

एकूण मतदान : ६१ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – नामदेव उसेंडी
महायुती – अशोक नेते (भाजप)
आप – डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मारोतराव कोवासे - काँग्रेस - 3,21,756 मतं - 38.43%
अशोक नेते – भाजप – 2,93,176 मतं - 35.02%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 12,85,387
पुरुष : 6,51,543
महिला : 6,33,844
<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  गडचिरोली-चिमूर


काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 नक्षलवादाचे रडगाणे गात वाटचाल.

 गेल्या वेळी विदर्भात निर्माण झालेल्या अनुकूल फायद्यामुळे कोवासे निवडून आले होते. यंदा मात्र परिस्थिती तेवढी चांगली नाही. काँग्रेसचे स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांची नाराजी कोवासे यांना त्रासदायक ठरू शकते.

 गडचिरोली परिसरात राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिताच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली. या साऱ्या बाबी काँग्रेससाठी अडचणी वाढविणाऱ्या आहेत.

 मात्र आदिवासींमध्ये काँग्रेसबद्दल असलेली आपुलकी फायदेशीर ठरेल, असे काँग्रेसचे गणित आहे. कोवासे यांच्याबद्दलची नाराजी, पक्षांतर्गत गटबाजी हे सारे आपल्या पथ्थ्यावर पडेल, असे भाजपचे गणित आहे.

 विदर्भातून यंदा जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचा प्रयत्न आहे.

 गडचिरोलीसाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची शासनाने केलेली घोषणा सत्ताधारी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.


मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 हा जिल्हा देशाला भेडसाविणा-या नक्षल समस्येच्या केंद्रस्थानी आहे.

 या मतदारसंघात ६० टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली आहे त्यातही हे राखीव वन क्षेत्र असल्याने मोठे उद्योग नाहीत त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे.

 सोबतच याच वनकायद्यामुळे या भागातील सिंचन प्रकल्प अडले आहेत.

 याच मतदारसंघात राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेल्या गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा जात आहे. या कालव्याचे काम २० वर्षे रखडल्याने शेतकरी संतप्त आहेत.

 आदिवासीना नक्षल समस्येपासून दूर ओढून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न नाहीत.

 ज्या भागात तुलनेने नक्षल प्रभाव कमी आहे त्या भागात विकासाच्या योजना भ्रष्टाचाराने पोखरल्याचे चित्र आहे.

 याशिवाय आदिवासी प्राबल्यामुळे अन्य समाजाकडे विशेषतः OBC प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष धुमसता मुद्दा आहे.

जातीपातीची समीकरणं
 या लोकसभा मतदारसंघात ६० टक्के आदिवासी मतदार आहेत. तर साधारण १५ टक्के मतदार OBC आहेत.

First Published: Thursday, April 3, 2014, 17:50
First Published: Friday, May 16, 2014, 20:36
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?