LIVE -निकाल रामटेक

www.24taas.com, झी मीडिया, रामटेक

संध्याकाळी 7:25 वाजताअपडेट शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 हजार 791 मतांनी विजयी

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  रामटेक


संध्याकाळी 5 वाजताअपडेट सोळाव्या फेरीनंतर कृपाल तुमाने 1 लाख 45 हजार 108 मतांनी आघाडीवर

संध्याकाळी 4 वाजताअपडेट
आठव्या फेरीनंतर रामटेकचे कृपाल तुमाने 61 हजार मतांनी आघाडीवर


मतदारसंघ : रामटेक (एससी)

मतदान दिनांक : १० एप्रिल

एकूण मतदान : ५५.४५ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – मुकुल वासनिक (काँग्रेस)
महायुती – कृपाल तुमाने (शिवसेना)
आप – प्रताप गोस्वामी

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मुकुल वासनिक – काँग्रेस – २,९४,९१३ मतं – ३८.५७%
कृपाल तुमाने – शिवसेना – ३,११,६१४ मतं – ४०.७५%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,०२,९००
पुरुष : ७,८६,५६४
महिला : ७,१६,३३६

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 वर्षांनुवर्षे दिल्ली दरबारी राजकारण केलेले असल्याने वासनिक यांना दिल्लीचेच जास्त आकर्षण. यातूनच बहुधा त्यांना मतदारसंघात फिरण्यास कमी वेळ मिळाला असावा, अशी टीका केली जाते.

 गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीमुळे वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आली. देशातील दुर्बल घटकांचा नेता म्हणून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याची चांगली संधी वासनिक यांना चालून आली होती, पण वासनिक हे दिल्लीतच अडकले.

 खात्यावर किंवा मतदारसंघात वासनिक स्वत:चा असा ठसा उमटवू शकले नाहीत. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वासनिक यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आणि पक्षसंघटनेचे काम सोपविण्यात आले.

 निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे वासनिक यांचे मतदारसंघातील दौरे वाढले.


जातीपातीची समीकरणं
 तेली समाजाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. त्या पाठोपाठ दलित, कुणबी, मुस्लिम आणि आदिवासी मतदार रामटेक मध्ये आहेत.

 १५ लाख मतदार असलेल्या रामटेक मध्ये ३.५ लाख तेली, २.५ लाख कुणबी, ३ लाख दलित, १.५ लाख मुस्लिम आणि १ लाख आदिवासी मतदार आहेत


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:36
First Published: Friday, May 16, 2014, 21:02
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?