Last Updated: Sunday, May 25, 2014, 12:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या फांदीला गच्च पकडून असते. आपण १०० वर्षांपू्र्वीच्या घटना क्षणार्धात सांगू शकतो. पण पुढच्या क्षणी आपले काय होणार आहे, हे ठामपणे सांगू शकत नाही. ते आपल्याला माहित नसते. पण पुढे काय होणार याची चाहूल ज्याला लागते, त्याला आपण ज्योतिष किंवा भविष्य असे म्हणतो. राशी नक्षत्रांच्या भक्कम पायावरच ज्योतिषशास्त्र ठामपणे उभे आहे. त्यासाठी तपश्चर्या आणि अभ्यास आहे. म्हणूनच भविष्याच्या आधारावर माणसाच्या ग्रीष्मासारख्या शुष्क जीवनातसुद्धा गुलमोहर बहरत असतो. दुःखाने तरळलेल्या अश्रूंच्यासुद्धा भविष्याच्या चाहुलीने क्षणार्धात श्रावणसरी होतात...