डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीनं गमावला जीव

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीनं गमावला जीव

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:50

सोलापूर शासकीय रूग्णालयातल्या डॉक्टरांचा मनमानीपणा चव्हाट्यावर आलाय. कुत्र्यानं चावा घेतलेल्या एका मुलीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झालाय. मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राखून ठेवल्यामुळं डॉक्टर आणि मृताच्या नातेवाईकात वाद झाला. उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

Last Updated: Monday, June 23, 2014, 18:09

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

Last Updated: Friday, June 20, 2014, 21:57

विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

सोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

सोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Last Updated: Friday, June 20, 2014, 21:25

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती

Last Updated: Friday, June 20, 2014, 20:32

सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

मी राजीनामा देण्यास तयार, पण... - मुख्यमंत्री चव्हाण

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:35

राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

पालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!

Last Updated: Friday, June 20, 2014, 12:36

पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.

आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज

आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज

Last Updated: Friday, June 20, 2014, 08:35

मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.. आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.

यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

Last Updated: Thursday, June 19, 2014, 19:18

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.