Last Updated: Wednesday, September 26, 2012, 17:18
www.24taas.com, मुंबई राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.
बारामतीच्या जनतेनं केंद्रासाठी आपल्याला निवडून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सरकारला कोणताही धोका नाही. अजित दादांच्या राजीनाम्यानंतर घडणाऱ्या घडामोडींमध्ये दबावतंत्राचा कुठलाही भाग नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शुक्रवारपर्यंत राजीनामा प्रकरणावर नक्की तोडगा निघू शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आता पुढे काय? या प्रश्नावर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्थरांवर खल सुरू आहे. यामध्ये साहजिकच सुप्रिया सुळे यांचं नावही पुढे येतंय. यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
First Published: Wednesday, September 26, 2012, 17:18