निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं ,Sperm Donner

निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं

माणसानं कसं दिलंय निसर्गाला आव्हान ?

आता माता-पित्यांशिवाय जन्माला येणार बाळ !

कसा होईल `त्या` बाळांचा जन्म ?

निसर्गाला आव्हान

भविष्यात आपत्याला जन्म देण्यासाठी स्त्री-पुरुषांची खरचं गरज उरणार नाही ? विज्ञानाने खरंच इतकी प्रगती केलीय की ज्याच्या मदतीने कृत्रिमरित्या मुलं जन्माला येवू शकेल... ब्रिटनच्या जेनेटिस्ट डॉ. आरती प्रसाद यांनी हा सिद्धांत मांडला आहे..माणसाच्या शरिरातील वाय क्रोमोझोम लुप्त होत असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे... एका शुन्यापासून सृष्टीची निर्मिती झाली आणि जवळपास चार अब्ज बर्षांत असंख्य ग्रह... तारे .... पृथ्वी आणि असंख्य जीव जंतूची निर्मिती झाली...पृथ्वीवर मानवाची निर्मिती कशा पद्धतीने झाली यावर वैज्ञानिकांमध्ये आजून एकमत नाही...त्यामुळेच मानवाच्या निर्मितीचं कुतुहल आजही कायम आहे....अनेक संशोधकांनी वेगवेगळे सिद्धांत आजवर मांडले आहेत...

इव्ह आणि एडमच्या संबंधमुळे मानवतेला सृष्टीचं महत्व पटलं...त्यानंतर जन्माला आलेल्या पिढ्यांनी समाजाचा पाया घातला आणि त्यातून आजचा आधुनिक समाज विकसीत झाला ... सुरुवातीचा मानव ते आजच्या युगातील प्रगत मानव हे अंतर पार करण्यासाठी माणसाला अनेक वर्षांचा कालावधी लागला आहे... ....याच काळात प्रेम,माया, नातेसंबंध , कुटुंब अशा विविध भावभावनांचे त्याला आज कांगोरे लाभले आहेत..

मानवाच्या प्रजोत्पादनाला कारणीभूत ठरलेले ते हळूवार संबंध आता मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे... होय....इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये अनुवंश विज्ञान विभागात संशोधक म्हणून काम करणा-या आरती प्रसाद यांनी आपल्या लाईक अ व्हर्जिन या पुस्तकात ही थेअरी मांडली आहे... महिला आणि पुरुषाविना आपत्य जन्माला येणार असल्याच आरती प्रसाद यांनी आपल्या थेअरीत मांडलं आहे..
निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं


त्याच्या म्हणण्यानुसार निसर्गाने हा कारनामा काही जीवजंतूंच्या बाबतीत अधीच करुन ठेवला आहे....स्त्री-पुरुषांच्या संबंधाशिवाय मुल जन्माला येणं ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य होणार असल्याचा दावा आरती यांनी केलाय...दोन कारणांमुळे ही बाब शक्य असल्याचा आरती यांना वाटतयं.. आरती यांनी ज्या दोन शक्यतांचा उल्लेख केला आहे त्या पैकी पहिल्या शक्यतेमध्ये Y क्रोमोझोमचा उल्लेख केला आहे. मानव विकास प्रक्रिये दरम्यान माणसाच्या डीएनएमध्ये आढळून येणारा Y क्रोमोझोम हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे...

खरं तर पुरुष जातीचं आपत्य जन्माला येण्यामागे y क्रोमोझोम महत्वाची भूमिका बाजावतो... तर दुस-या शक्यतेमध्ये आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून स्त्री- पुरुषांविना मुलाचा जन्म शक्य असल्याचं आरती यांनी स्पष्ट केलं आहे... खरंतर काही वर्षांपर्यंत टेस्ट ट्यूब बेबीची कल्पनाही कोणी केली नव्हती...पण आता त्यात काही नवल राहिलं नाही...लोकांसाठी ती एक सामान्य बाब बनली आहे...स्पर्म डोनर आणि एग डोनरच्या मदतीने स्त्री-पुरुषाच्या संबंधाविना आपत्य मुल जन्माला येतं...त्यामुळेच आज जगभर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पहायला मिळतात... पण आगामी काळात शास्त्रज्ञ स्पर्म डोनर आणि एग डोनरची गरजही संपूष्टात आणण्याच्या मार्गावर आहेत..

पण आरती यांनी मांडलेली ही थेअरी समोर येताच ब्रिटनपासून जगभरातील देशांमध्ये धर्मापासून ते नैतिकतेपर्यंत एकच चर्चा सुरु झाली.. स्त्री- पुरुषाविना आपत्य जन्माला घालण्याच्या तंत्रज्ञानाला मंजूरी दिल्यास मानवता आणि आजचा समाज मोडकळीस तर येणार नाही ना अशी भिती या थेअरीचा विरोध करणा-यांनी व्यक्त केली आहे...

निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं

माता-पित्याशिवाय बाळाचा जन्म आज अशक्य वाटतं असला तरी विज्ञानाने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे...कृत्रिम पद्धतीने बाळाला जन्म घातला जाऊ शकतो का ते आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत... पती-पत्नीसाठी आपत्य निसर्गाची देणं आहे....स्त्री-पुरुषांच्या संबंधातून आपत्य जन्माला येतं हा निसर्गाचा नियम आहे...पण आता याच नियमाला छेद दिला जाण्याचा शक्यता नाकारता येत नाही.. स्त्री-पुरुषाविना आपत्य जन्माला घालणं शक्य असल्याचा दावा इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये जेनेटिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या आरती प्रसाद यांनी केलाय....मानसाच्या प्रजोत्पादनासाठी स्त्री-पुरुषाची गरज संपूष्टात येणार असल्याचं आरती यांचं म्हणनं आहे..

जेनेटिस्ट आरती प्रसाद यांनी आपल्या सिद्धांताच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले आहे.. आरतींच्या म्हणण्यानुसार कृत्रिमरित्या स्पर्म तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यापूर्वीच यश मिळवलं आहे..ब्रिटन आणि जर्मनीतील शस्त्रज्ञांनी तो शोध लावला आहे.. २००६ आणि २००९मध्ये ब्रिटिश तसेच जर्मन प्रयोगशाळेत कृत्रिम स्पर्म तयार करण्यात आले. कृत्रिमरित्या स्पर्म तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्यामुळे माणसाच्या प्रजोत्पदनातील स्त्री-पुरुषांचं महत्व संपणार असल्याचं आरती यांच म्हणनं आहे.. अनुवंशास्त्रात संशोधन करणा-या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात एका महिला डोनरच्या स्टेम सेलपासून जर्म सेल तयार करण्यात त्यांना यश मिळालंय...हे यश या प्रक्रियेत फार महत्वाचं मानलं जातंय़.. विशेष म्हणजे कृत्रिम स्पर्मला स्त्रीबीजाशी प्रजोत्पादन करण्याचा कारनामा संशोधकांनी केला आहे... या संशोधनामुळे पुरुषाची गरज संपूष्टात येणार तर नाही ना यावर आता चर्चा सुरु झालीय... प्रयोगशाळेत कृत्रितम स्पर्मपासून उंदराचा जन्म झाला तेव्हापासूनच ही चर्चा सुरु झाली होती...

हे प्रजोत्पादन माणसाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचं ठरणार आहे...कारण ज्या पद्धतीने उंदरावर तो प्रयोग करण्यात आला त्याच पद्धतीने मुलाला जन्म दिला जाऊ शकतो असं आरती यांचा दावा आहे..या नव्या तत्रज्ञानामुळे मातेच्या गर्भाची गरज संपणार आहे... ऑस्ट्रेलियात प्लास्टिकपासून कृत्रिम गर्भ तयार करण्यात आला असून एका महिलेच्या गर्भात जे रसायन आढळून येतात ते सर्व त्या कृत्रिम गर्भात तयार करण्यात आले होते..कृत्रिम गर्भाचा वापर करुन माशाला जन्म दिला गेला आहे..आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाच्या फर्टीलाईज्ड एगची वाढ करता येण शक्य आहे..हे आधुनिक तंत्रज्ञान पहता भविष्यात मुलाच्या जन्मासाठी आईची गरजही भासणार नाही..क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली डॉली नावाच्या मेंढीला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती..या सगळ्या पार्श्वभूमीवर आरती प्रसाद यांच्या सिद्धांतात तथ्य़ असल्याचं बोललं जातंय..कारण सिंथेटीक शुक्र जंतू आणि अंडणू तयार करुन कृत्रिम गर्भात मुल वाढवलं जाऊ शकतं ... डॉ. आरती प्रसाद यांच्या त्या संशोधनामुळे ब्रिटनपासून भारता पर्यंत एकच चर्चा सुरु झालीय...या विषय़ी धर्म आणि विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या जानकारांचं काय म्हणनं आहे ते आता आपण पहाणार आहोत.

निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं

आपत्य जन्माला घालण्यासाठी स्त्री-पुरुषांची गरज असते..पण आता ती गरजही उरणार नाही...आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्त्री-पुरुषाविना मुलाला जन्म देता येणार आहे...या नव्या सिद्धांताविषयी आज जगभर चर्चा सुरु झाली आहे..पण या सिद्धांताविषयी डॉ.आरती प्रसाद यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे.. विकासाच्या प्रक्रियेत सर्वच प्राण्यांमध्ये पुल्लिंग निश्चित करणारा Y क्रोमोझोम लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचं संशोधकांचं म्हणनं आहे....याच वेगाने Y क्रोमोझोम लुप्त झाल्यास मानव जात नष्ट तर होणार नाही ना ? अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे..

एकीकडं ही परिस्थिती असतांना संशोधक कृत्रिम पद्धतीने मुलं जन्माला घालण्याची पद्धत शोधून कढण्याचा प्रयत्न करत आहेत.. डॉ.आरती यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न स्त्री-पुरुषांच्या शारिरिक संबंधाचा नसून तो मानव जातीच्या संवर्धनाचा आहे...आणि त्यादृष्टीने या सगळ्या शोधाकडं बघण्याची आवश्यकता आहे. डॉ. आरती प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार आज लग्न न करताच आपत्य जन्माला घालण्याकडं नव्यपिढिचा ओढा वाढत चालला आहे...त्यामुळे स्त्री-पुरुषांच्या संबंधाविषयी समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे...

आज पुरुषही आईची भूमीका बजावू शकतो..त्यामुळे गर्भाला इतकं महत्व देण्याची आवश्यकता नसून कृत्रिमरित्या मुलाला जन्म देण्याच्या तंत्रज्ञानाला मंजूरी देण्याची आवश्यकता असल्याचं डॉ. आरती यांच म्हणनं आहे.... आरती प्रसाद यांच्या या संशोधनाचं काही महिलावादी संघटनांनी समर्थन केलं आहे...या नव्या संशोधनामुळे मुलांना जन्म देण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतून महिलांची सुटका होईल असा दावा त्यांनी केला आहे... या सगळ्या पार्श्वभूमिवर आरती यांनी आपल्या पुढच्या पुस्तकाचं नाव द एन्ड ऑफ सेक्स, द क्वेस्ट फॉर रिप्रोडक्शन विदाऊट सेक्स हे ठेवलं आहे..

मुलाचं काय होणार ?

माता-पित्याशिवाय मुलांचं काय होणार ?
आई-वडिलांशिवाय मुलांच्या जन्माचा सिद्धांत धार्मिकतेच्या विरोधात ?
माता-पित्याशिवाय मुलांच्या जन्माला मंजूरी दिली जावी ?
आई-वडिलांशिवाय मुलांचा जन्म झाल्यास समाज विखुरला जाईल ?
कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल ?
शरीर संबंधांचं महत्व केवळ संतती प्राप्तीसाठीचं ?
स्त्री-पुरुषांच्या संबंधातून प्रणय दूर केल्यास मानोविकार वाढणार तर नाही ना ?

First Published: Thursday, August 23, 2012, 00:04


comments powered by Disqus