Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:01
www.24taas.com, मुंबई गुरुवारी अग्नी - 5 या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी झाली आणि अर्धं जग भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं. अग्नी -5 चा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अवघ्या 20 मिनिटात पाच हजार किलोमिटर अंतर पार करण्याची क्षमता अग्नी -5मध्ये आहे.
युद्धाच्या मैदानात सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वात घातक शस्त्र म्हणजे क्षेपणास्त्र. त्या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीलाही मागे टाकणारा असून 5 हजार किलोमीटर पर्यंत शत्रूवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. शत्रूला जराही हालचाल करायला संधी देत नाही हे क्षेपणास्त्र...अर्ध्या जगात कुठेही लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र जगातल्या काही निवडक देशांकडंच आहेत.पण आता भारतही त्या निवडक पाच देशांत सहभागी झालाय..पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आता भारतानेही प्राप्त केली आहे. अग्नी पाच या क्षेपणास्त्रामुळेच भारताला हे बळ मिळालंय. अग्नी - पाच हे भारताचं महाशक्तीशाली क्षेपणास्त्र आहे.
आता जर कोणी भारताकडं वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडस केलं तर तो देश जगात कुठेही असला तरी अग्नी पाच हे क्षेपणास्त्र त्याला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. होय भारताचं अग्नी क्षेपणास्त्र आपल्या शत्रूला जराही हालचाल करण्याची संधी देत नाही.कारण एकदा लक्ष्य निश्चित केल्यानंतर आणि एक बटन दाबल्यावर हे क्षेपणास्त्र अवघ्या काही मिनिटांत पाच हजार किलोमीटरचं अंतर पार करुन लक्ष्य भेदतं...पाच हजार किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला केवळ 20 मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे..होय अवघ्या 20 मिनीटात अग्नी पाच क्षेपणास्त्र शत्रूला बेचिराख करु शकतं..या क्षेपणास्त्रामुळं भारत बनलाय सुपर पॉवर.
अग्नीचं परिक्षण यशस्वी झाल्यामुळं भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे...पण त्यासाठी वैज्ञानिकांनी 14 वर्ष कठोर मेहनत केली आहे..आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. अग्नी पाचच्या यशस्वी परीक्षणाबरोबरच भारताने क्षेपणास्त्राचं असं काही चक्रव्यूह तयार केलंय की ते भेदणं सहजासहजी कोणाला शक्य होणार नाही. कारण आता भारताकडं आहे अग्नी पाच हे पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र . 14 वर्षाच्या कालावधीत जगातील सर्वात वेगवान अग्नी पाच हे क्षेपणास्त्र तयार करुन भारताने इतिहास घडवलाय. या बहुमोल कामगिरीबद्दल पंतप्रधांनांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय.
ओडिशाच्या व्हीलर बेटावरुन अग्नी पाच झेपावल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात त्याने पाच हजार किलोमिटरचं अंतर पार करुन आपल्या निर्धारीत लक्ष्याचा वेध घेतला. अग्नीने जे लक्ष्य़ भेदलं आहे ते ऑस्ट्रेलिया पलिकडं आहे..डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार अग्नीने तेव्हडंच अंतर दुस-या दिशेला पार केलं असतं तर भविष्यातील सर्वात मोठ्या अव्हानं संपूष्टात आलं असतं.
अग्नी पाचच्या यशस्वी परिक्षणासोबतच या वर्षी आणखी एक परिक्षण घेण्यात येणार असल्याचं डीआरडीओने जाहिर केलं आहे..तसेच अग्नीला मोबाईल लाँचरवरुन सोडण्यात येणार आहे..या परिक्षणानंतर अग्नी पाच हे भारतीय सैन्य़ात दाखल होणार आहे. अग्नी पाचमुळे भारतीय सैन्याला दहा हात्तीचं बळ लाभणार आहे.अग्नी पाच हे क्षेपणास्त्र केवळ युद्धनितीसाठीच नाही तर कुटनितीसाठीही त्याचा वापर होणार आहे.. भारतावर हल्ला करण्यापूर्वी शत्रूला अनेक वेळा विचार करावा लागणार आहे. कारण भारतावर हल्ला केल्यास अग्नी पाचचा सामना करावा लागणार याची जाणीव त्या राष्ट्राला ठेवाणी लागणार आहे. तसेच अग्नीपाच पासून वाचणं त्यांना शक्य होणार नाही..
पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा वेध घेणारं अग्नी-5 हे क्षेपणास्त्र भारताने तयार केलंय. अशा प्रकारचं क्षेपणास्त्र भारताच्या सैन्यात असावं यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केला जात होता..कारण पाकिस्तानच्या कोणत्याही भूभागावर हल्ला करण्याची क्षमता भारताने यापूर्वीच प्राप्त केली आहे..मात्र चीनच्या बाबतीत मर्यादा येत होत्या...अग्नी - पाचमुळे त्या सगळ्या मर्यादा आता गळून पडल्या आहे..
भारताशी क्षेपणास्त्रांच्या शर्यतीत पाकिस्तान सर्वात वरच्या क्रमांकावर आहे मात्र पाकिस्तानच्या कोणत्याही भू भागावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी भारत सक्षम असून भारताकडं क्षेपणास्त्रांची एक श्रृंखलाच आहे..पण त्या तुलनेत चीनवर हल्ला करण्याच्या दृष्टीने भारतावर काही मर्यादा येत होत्या...या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून भारतीय वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत करत होते..आता भारताने अंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार केलं आहे...अग्नी पाचमुळे भारत क्षेपणास्त्रात सुपर पॉवर बनला आहे.
अग्नी पाच क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झालीय..ओडिशाच्या व्हिलर बेटावरुन अग्नी पाच हे क्षेपणास्त्र सकाळी आठ वाजून 7 मिनिटांनी एका लाँचरवरुन आकाशात झेपावले.आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरीन पटीनं त्याचा वेग अधिक होता.. अवघ्या 20 मिनिटात त्याने आपल्या लक्ष्याचा वेध घेतला...त्यामध्ये जवळपास 50 टन वजन आणि स्फोटकं भरण्यात आली होती..अग्नीसाठी हिंद महासागरात एक लक्ष्य निश्चित करण्यात आलं होतं... सुमारे 600 किलोमिटरची उंची गाठल्यानंतर अग्नी पाच जमिनीच्या दिशेनं झेपावलं आणि हिंद महासागरातील पाच हजार किलोमिटर अंतरावर असलेल्या आपल्या लक्ष्याचा वेध त्याने घेतला...अग्नी पाच या अण्वस्त्रवाहू अत्याधुनिक क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी झाली...अग्नीसाठी निश्चित केलेलं लक्ष्य हे ऑस्ट्रेलिया पलिकडचं होतं...या क्षेपणास्त्राच्या गगनभेदी झेपेमुळे भारत अंतरखंडीय क्षेपणास्त्र क्षमता असलेला जगातील पाचवा देश बनला आहे.

भारताच्या या कामगिरीची जगभराने दखल घेतली आहे...विशेषता चीनने अग्नी पाचचा मोठा धसका घेतलाय. अग्नी पाच हे क्षेपणास्त्र केवळ युद्धनितीसाठी नाही तर कुटनितीसाठीही फायदेशीर ठरणार आहे..या क्षेपणास्त्रामुळे केवळ युद्घाची दिशाच बदलता येणार आहे असं नाही तर युद्ध टाळता देखील येणार आहे...
चीनकडं डोंगफेंग नावाच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे..त्यामध्ये 300 ते 18 हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे....गेल्या काही वर्षात चीनने आपली सैन्यशक्ती मोठ्या प्रमणात वाढवली आहे..हिमालयातील भारतीय भूभागावर आपला हक्क सांगण्याचं धाडस चीनने या सैन्यशक्तीच्या बळावरचं केलं आहे.. तसेच हिंदमहासागरातही चीनी ड्रॅगनने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे..पण आता भारताने आंतरखंडीय अग्नी - पाच या क्षेपणास्त्राचं सफल परिक्षण केल्यामुळे चीनचा दबाव कमी होण्यास मदत होणार आहे...अग्नी - पाच क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात दाखल होण्यापूर्वीचं त्याचे परिणाम दिसू लागल्याचं युद्धनितीकारांचं म्हणनं आहे...भारतावर सैन्य तसेच क्षेपणास्त्र हल्ला केल्यास भारत त्या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देऊ शकतो याची जाणीव आता भारताच्या शत्रूंनाही झाली आहे..त्यामुळं आता भारातच्या शत्रूंवरचा दबाव वाढला आहे.. चीनची क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली भेदण्याची ताकद भारताच्या अग्नी - पाच या क्षेपणास्त्रात आहे..खरं तर चीनने आपल्या क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीत अतिउच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे..पण ज्या वेगाने अग्नी- पाच शस्त्रूचा वेध घेतं तो वेग पहाता चीनची विद्यमान क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली अग्नीला तोंड देण्यास असमर्थ असल्याचं जानकारांचं म्हणनं आहे....अग्नी-पाच क्षेपणास्त्र हवेत झेपावल्यानंतर तात्काळ शत्रूला त्याची खबर लागली तरी शस्त्रूचं क्षेपणास्त्र आकाशात पोहचू पर्यंत अग्नी-पाच ने आपल्या लक्ष्याचा वेध घेतलेला असेल..यावरुन अग्नी - पाचचा वेग तुमच्या लक्षात आला असेल . अग्नी- पाचचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे..त्यामुळे त्याचा पाठलाग करुन त्याला नष्ट करणं शत्रूच्या क्षेपणास्त्राला शक्य होणार नाही.
अग्नी - ५ क्षेपणास्त्रामुळं भारताच्या दुस-या फळीतील क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ झालीय..आज ज्या पद्धतीने भारताच्या भोवताली वातावरण तयार झालंय ते पहाता अणुवस्त्र हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही..त्यामुळे अशा वातावरणात अग्नी- पाच क्षेपणास्त्रचं महत्व वाढलंय...भारतावर अणुशस्त्रांनी हल्ला केल्यास भारत काही मिनिटातच त्याचं उत्तर देऊ शकतो आणि हे अग्नी - 5 मुळे भारताला शक्य आहे याची जाणीवर भारताच्या शस्त्रूंनाही झाली आहे..आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली भारताची अरिहंत आणि आयएनएस चक्र या पानबुड्या आज समुद्रात गस्त घालतं आहेत..या पाणबुड्यांच्या माध्यमातून खोल समुद्रातून अनेक महिने लपून राहून शत्रूवर क्षेपणास्त्रांचा मारा केला जाऊ शकतो..

अग्नी- 5 क्षेपणास्त्रामुळे भारत आता जगातील पाच शक्तीशाली देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे..अग्नी- 5मुळे भारताचं सुरक्षा चक्र मजबूत झालं आहे..भारताची सैन्य ताकद वाढल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम स्वरुपी सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी भारताचा दावा आणखीनच मजबूत झालाय. भारतीय क्षेपणास्त्रांच्या ताफ्यातील कमतरता अग्नी- 5 मुळे दूर होणार आहे..मात्र अद्यापही आपण सुपरसोनिक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतलेली नाही.. एक हजार किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचं परिक्षण घेतलं जाणार आहे तसेच लेझर हल्ला करण्याची प्राप्त करायची आहे..
First Published: Saturday, April 21, 2012, 10:01