वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात

वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

`आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नाही... नुसत्याच कसल्या आत्महत्या करताय? मरायचंच असेल तर मंत्र्यांना मारुन मरा` असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आता या वक्तव्याची चौकशी होणार असल्यामुळे राज ठाकरे अडचणीत आलेत..


`यवतमाळमध्ये ४५०हून अधिक आदिवासी कुमारी माता आहेत. कंत्राटदार इथल्या आदिवासी मुलींना नोकरीचं आमिष देवून त्यांची फसवणूक करतात. यवतमाळच्या खासदार एक महिला आहेत, तरीही त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली नाही` असंही यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 14:42
First Published: Tuesday, April 8, 2014, 14:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?