कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

Last Updated: Sunday, June 22, 2014, 18:37

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान

Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:21

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय

Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:39

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय मिळाल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकाच्या गाठीभेटी घेतल्या.

मुख्यमंत्री बदल,काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरुच

Last Updated: Saturday, June 21, 2014, 17:14

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी ए.के.एन्टोनींची भेट घेतलीय. तर महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांना म्हटलं `रिजेक्टेड माल`

Last Updated: Saturday, June 21, 2014, 16:35

राजकारणी लोक एखादं वक्तव्य करण्याआधी अगोदर विचार करतात का? असा प्रश्न निर्माण व्हावा, असं वक्तव्य गुजरातच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलंय... एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलांना चक्क `रिजेक्टेड माल` असं संबोधलंय.

घालमेल वाढली; रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरुच

Last Updated: Saturday, June 21, 2014, 11:26

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले.

नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव

Last Updated: Friday, June 20, 2014, 20:06

राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल - शरद पवार

Last Updated: Friday, June 20, 2014, 18:53

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.

मी राजीनामा देण्यास तयार, पण... - मुख्यमंत्री चव्हाण

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:35

राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे

Last Updated: Friday, June 20, 2014, 11:47

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

Last Updated: Thursday, June 19, 2014, 22:25

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

महायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव

Last Updated: Thursday, June 19, 2014, 20:03

शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

मुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही

Last Updated: Thursday, June 19, 2014, 18:27

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका तूर्तास भाजपनं घेतलीय.

`महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री`

Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:02

महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आलाय. सामनाच्या संपादकीयातून ही भूमिका मांडण्यात आलीय.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, शिंदेंचे नाव आघाडीवर

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 15:27

वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मालमत्ता जाहीर न करणारे मंत्री?

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:19

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊनही, आघाडी सरकारमधील 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजून आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवलीय. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे, हेच यावरून स्पष्ट दिसतंय...

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 12:03

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला खडे बोल

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 17:16

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागांची मागणी केल्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

Last Updated: Saturday, June 14, 2014, 12:48

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

खूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 15:30

राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.

एलबीटी रद्दचा चेंडू पालिकांच्या कोर्टात

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:24

एलबीटी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महापौरांची आणि आयुक्तांची बैठक घेतली. मात्र या बैठकीतून ठोस काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे एलबीटी रद्द होण्याची आशा धूसर झाली आहे.

काँग्रेसमध्ये `बाबा विरूद्ध बाबा`

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 21:33

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबूंच्या गराड्यात असतात, त्यामुळेच कामं होत नसल्याचा घरचा आहेर काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकींनी दिला आहे.

मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढू देणार नाही - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, June 7, 2014, 19:52

मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

पवारांना CM उमेदवार जाहीर केलं तरी फरक नाही - तावडे

Last Updated: Saturday, June 7, 2014, 17:52

शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचंही अब की बार, शरद पवार!

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:58

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.

पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते

Last Updated: Friday, June 6, 2014, 19:52

राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:06

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

मोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य

Last Updated: Sunday, June 1, 2014, 22:13

राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.

उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री- राऊत

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची... राज ठाकरेंचं दिवास्वप्न!

Last Updated: Saturday, May 31, 2014, 18:32

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मनसेतर्फे पुढे आणण्याचा मनसे नेत्यांचा विचार आहे.

कोणाला स्वत:च मुख्यमंत्री व्हायचंय, उद्धव ठाकरेंचा राजना टोला

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:22

“मला कार्यकर्ते आग्रह करतायत पण मी अजून त्याबाबत विचार केलेलाच नाही”, हे वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी. शिवाय कुणाला स्व:तच मुख्यमंत्री व्हायचंय, असं म्हणत त्यांना राज ठाकरेंना टोला हाणायची संधीही सोडली नाही.

मुख्यमंत्री मोदींच्या पगाराचं काय झालं?

Last Updated: Monday, May 26, 2014, 13:25

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाही पगार घेत नव्हते. त्यांचा गेल्या १२ वर्षांचा पगार जमा झाला होता. त्यांनी हा पगार आपल्या चालक, रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भेट दिल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत असून तो धुमाकूळ घालत आहे.

‘राणे गट’ मुख्यमंत्र्यांना धक्का देणार?

Last Updated: Thursday, May 22, 2014, 10:31

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय. निकालानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी पाठ फिरवली आणि आपली नाराजी दाखवून दिली.

शिवसेना की भाजप... पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?

Last Updated: Thursday, May 22, 2014, 10:02

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याचे वेध महायुतीला लागलेत.

आनंदीबेन गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 16:17

आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदी हे सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद आनंदीबेन पटेल पाहणार आहेत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 14:02

केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी महाष्ट्रात हे शिवसेना-भाजप आघाडीचे असेल. मात्र, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘एनडीए’च्या बैठकीनिमित्त उद्धव ठाकरे राजधानीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

राजकारणात प्रवेश करण्यासाठी किरण बेदी तयार; मुख्यमंत्री होणार?

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 11:53

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर कौतुकांचा वर्षाव करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णातील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांनी राजकारणात शिरकाव करण्याचे संकेत दिलेत.

जीतन राम मांझी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री

Last Updated: Monday, May 19, 2014, 23:23

जीतन राम मांझी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना नितीश कुमार यांनी सांगितलं,

मुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी

Last Updated: Sunday, May 18, 2014, 18:55

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..

दारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!

Last Updated: Sunday, May 18, 2014, 15:36

काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.

बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद

Last Updated: Sunday, May 18, 2014, 10:16

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.

अपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:28

बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:16

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.

मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही- सुप्रिया सुळे

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 21:38

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही. राज्यात अजितदादा हे सक्षम आहे, त्याचा प्रशाकीय अनुभव दांडगा आहे आणि तो भाषणही चांगलं करतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले आहे.

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:17

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

कोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

Last Updated: Monday, May 5, 2014, 11:30

कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`

Last Updated: Saturday, May 3, 2014, 19:09

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM

Last Updated: Saturday, April 26, 2014, 10:44

देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 17:17

भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.

मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले

Last Updated: Sunday, April 20, 2014, 13:05

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याला मालाडला शनिवारी रात्री अपघात झाला.

दिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 14:30

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक ट्विट करून पक्षाला चांगलंच अडचणीत आणण्याचं काम केलंय.

मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..

Last Updated: Monday, April 14, 2014, 12:40

राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.

मुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!

Last Updated: Friday, April 11, 2014, 13:26

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला मोफत सल्ले

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 12:39

आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला दगा देऊन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती केल्याचा खरमरीत आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 14:43

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार

Last Updated: Friday, March 21, 2014, 10:45

`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.

मुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे

Last Updated: Sunday, March 16, 2014, 13:22

‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 19:18

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:23

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 20:47

राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 21:16

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?

Last Updated: Monday, February 24, 2014, 11:54

२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:28

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा राजीनामा

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 15:49

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्य़मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

केजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा

Last Updated: Friday, February 14, 2014, 20:47

दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ

Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:06

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.

राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

Last Updated: Thursday, February 13, 2014, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

Last Updated: Thursday, February 13, 2014, 11:27

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:22

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

लोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन...

Last Updated: Monday, February 10, 2014, 11:41

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:23

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

CM साठी आठ वर्षे प्रलंबित रस्ता एका रात्रीत चकाचक

Last Updated: Friday, February 7, 2014, 16:03

एरव्ही रस्ते कोणी दुरुस्त करायचे यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाब्दीक चकमक होत असते. पण दापोलीत कृषी विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल के शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय आले आणि जिल्हा परिषदेचा रस्ता सार्वजनिक विभागानं एकदम डांबर टाकून चकाचक केला.

शिवसेनेत लाचारी, अजित पवारांची टीका

Last Updated: Friday, February 7, 2014, 08:26

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीये. साहेबांना निवडणुकीला उभं राहण्याचं आवाहन देण्यापेक्षा स्वतः उभं राहून दाखवावं, असं ते म्हणालेत.

आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम

Last Updated: Thursday, February 6, 2014, 22:05

कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.     

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:05

राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 19:12

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

Last Updated: Monday, January 27, 2014, 15:24

राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.

आम्ही गांडू नाहीत, 'दादा'गिरी चालणार नाही - राज

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:44

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत गरजलेत. त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. अजित पवार आम्ही गांडू नाहीत. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

अरविंद केजरीवाल वेडा मुख्यमंत्री – सुशीलकुमार

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 19:35

दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही.

`मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 17:10

मुख्यमंत्री कोट्यातील घर वाटपासंदर्भात राज्य सरकानं दिलेली माहिती अपुर्ण आहे, असा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केला आहे. आधी दिलेल्या यादीत नेत्यांच्या नातलगांच्या नावे असलेल्या घरांबाबत राज्य सरकारने अपूर्ण माहिती दिली आहे.

महापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 12:37

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 21:33

मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

LIVE : अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी

Last Updated: Thursday, January 2, 2014, 16:18

एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:34

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

केजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 19:46

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पुर्तता करण्याचा धडाका लावलाय. मोफत पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवालांनी आता स्वस्त वीज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

‘आदर्श’वरुन मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीनं चोळलं मीठ

Last Updated: Monday, December 30, 2013, 19:23

आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळल्यानंतर त्याबाबत फेरविचार करण्याची नामुष्की राज्य मंत्रिमंडळावर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर येणार आहे. दरम्यान, आदर्शमुळं अडचणीत आलेल्या काँग्रेसला पाठिंबा देताना, काँग्रेसविरोधात आक्रमक होण्याचे संकेत राष्ट्रवादीनं दिले आहेत.

आजारी असल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली दांडी!

Last Updated: Monday, December 30, 2013, 11:51

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.

महाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 21:03

अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.

`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 11:17

आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.

अण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 19:14

दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.

‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 17:16

नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...

`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल

Last Updated: Saturday, December 28, 2013, 13:05

रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

अरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, December 28, 2013, 12:30

दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत.

आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा - अजित पवार

Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:36

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.

मंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 21:06

दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.