www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदक्षिण मुंबईतील परळमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राष्ट्रवादी हा गळतीतून निर्माण झालेला पक्ष आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
पंतप्रधानपदासाठी तुमच्याकडे लायक उमेदवार आहे का? राहुल गांधींपेक्षा आमचा राहुल शेवाळे बरा, असा चिमटाही त्यांनी काढला.
रिपाइंचे रामदास आठवले, भाजप नेते विनोद तावडे यांचीही यावेळी भाषणं झाली. यावेळी रामदास आठवले यांचंही भाषण झालं त्यांनी मिश्किलपणे विरोधकांचा समाचार घेतला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 28, 2014, 21:58