भारत-पाकिस्तान संबंधांत सुधारणा - Marathi News 24taas.com

भारत-पाकिस्तान संबंधांत सुधारणा

www.24taas.com, इस्लामाबाद
 
पाकिस्तानी विदेशी मंत्री हिना रब्बानी खार यांचं म्हणणं हे की पाकिस्तान आता भारत आणि इतर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारत आहे. शांततामय वातावरणासाठी शेजारी राष्ट्रांशी पाकिस्तानचे संबंध सुधारणं आवश्यक असल्याचं हिना रब्बानी खार यांनी म्हटल्याचं 'असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान'तर्फे सांगण्यात आलं आहे.
 
त्या म्हणाल्या, दोन वर्षांनंतर आता पुन्हा भारताशी बोलणी सुरू झाली आहेत. अफगाणिस्तानशीही पाकिस्तानचे संबंध सुधारत आहेत. खार म्हणाल्या, पाकिस्तान संबंधित राष्ट्रांशी बोलणी करून सर्व समस्या सोडवू इच्छिते.
 
भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्र सातत्यपूर्ण बोलण्यातूनच आपापल्या समस्या सोडवू शकतात, असा विश्वास खार यांनी व्यक्त केला.

First Published: Tuesday, March 6, 2012, 16:31


comments powered by Disqus