Last Updated: Saturday, April 27, 2013, 20:36
www.24taas.com, झी मीडीया मुंबई मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौरानी म्हटलयं.
मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.मराठी शाळामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.सहा वर्षात तब्बल ५६ हजार विघार्थ्यांनी पालिकेच्या शाळा सोडल्या आहेत.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौर आणि शिक्षणधिकारीनी म्हटलयं.
विघार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर सकस आहार मिळण्यासाठी पालिका १४० कोटी रूपये खर्च करते.शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.मात्र पालिकेच्या शाळांमधील गळती कमी होऊ शकलेली नाही.यात मराठी शाळा बंद होत असल्यान मराठीवर राजकारण करणारे सत्ताधारी शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक मूक गिळून गप्प आहेत.
First Published: Saturday, April 27, 2013, 20:36