Last Updated: Monday, October 1, 2012, 09:37
www.24taas.com, मुंबई‘कसाब पाकिस्तानी नागरिक नाही’ असा दावा करणाऱ्या पाकिस्तान पुन्हा एकदा खोटारडा ठरलाय. अजमल कसाबने पाकिस्तानकडे मदत मागितल्याचं उघड झालंय.
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना कसाबनं पत्र लिहल्याचं उघड झालंय. कसाबने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला दोन पत्र लिहली आहेत. उर्दुतून लिहलेल्या पहिल्या पत्रात इस्माईल खान या त्याच्या अतिरेकी साथीदाराचा मृतदेह दफनविधीसाठी पाकिस्तानात नेण्याची मागणी त्याने केली होती.
तर दुस-या पत्रात कायदेशीर मदत म्हणून पाकिस्तानने पाकिस्तानी नागरिक असलेला वकील द्यावा अशी मागणी केली असल्याचं समोर आलंय. या दोन्ही पत्रांना पाकिस्तानी उच्चाय़ुक्त किंवा सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
First Published: Monday, October 1, 2012, 09:37