Last Updated: Tuesday, May 29, 2012, 19:23
www.24taas.com, मुंबई 
वाघांच्या वाढत्या शिकारीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ताडोबा दौऱ्यावर निघाल्यानंतर, वनमंत्री पतंगराव कदमांना जाग आली आहे. पतंगरावरही उद्या ताडोबा दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यामुळे मात्र राज ठाकरे यांच्यावर पतंगरावानी निशाणा साधला आहे, टीका करणं सोपं असतं. असं म्हणतं पतंगरावानी राज ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
आत्तापर्यंत आचारसंहितेमुळे ताडोबा अभयारण्यात जाऊ शकलो नसल्याचं कारणही वनमंत्री पतंगरावानी दिलं आहे. त्यामुळे उद्या ताडोबात राज आणि पतंगराव आमनेसामने असणार आहेत.
टीका करणे सोपे असते, असं सांगत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. आता राज ठाकरे या टीकेचा कसा समाचार घेणार याकडेच साऱ्य़ांचे लक्ष लागून राहिुले आहे.
First Published: Tuesday, May 29, 2012, 19:23