Last Updated: Friday, November 11, 2011, 11:50
झी २४ तास वेब टीम, नाशिक 
नाशिक जिल्ह्यात सटाण्याजवळ इंडिगो कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. कारमध्ये प्रवास करत असलेले सर्व जण ठार झाले आहेत. सर्व मृत अहमदनगरचे रहिवासी आहेत.
ते सर्वजण शंखेश्वरहून दर्शन घेऊन परत येत होते. सटाणा-तहाराबाद रस्त्यावर हा अपघात झाला असून कांद्यानं भरलेला ट्रक गुजरातकडे जात होता. तर कार अहमदनगरच्या दिशेनं जात होती. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
First Published: Friday, November 11, 2011, 11:50