गोदातीर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी - Marathi News 24taas.com

गोदातीर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री नाशिकचा गोदातीर लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकमधल्या गोदाकाठावर महिलांनी दिवे सोडून गंगा आणि गोदावरीची पूजा केली. या दिवशी गंगेत दिवे सोडल्यानं आयुष्यभराचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रध्दा आहे. संथ वाहणाऱ्या या गंगामाईच्या किनाऱ्यावर अनेक महिलांनी गर्दी केली होती.
 
दिव्यांच्या तेजस्वी किरणांनी गोदातीर अक्षरश: उजळून निघाला होता. गोदाकाठावर देव दिवाळी उत्साहात साजरी होत असल्याचा सात्विक आनंद या महिलांनी अनुभवला. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिव्याचे दान करण्यात येते. नदीमध्ये दिवे सोडण्यात येतात.

First Published: Friday, November 11, 2011, 17:07


comments powered by Disqus