मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा Ministers hide from Sugarcane price movement

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा
www.24taas.com, कोल्हापूर

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असूनही सरकार मात्र अजूनही ढिम्मच आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतक-यांना मात्र कोणीही वाली नाहीय. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

मंत्र्यांची दिवाळी साजरी होत असली तरी शेतक-यांचा मात्र शिमगा सुरु असल्याचं चित्र आहे. शेतकरी आणि पोलिसांना एकमेकांविरुद्ध लढायला लावून सरकार मात्र ही लढाई बघण्यात दंग आहे. ऊसदराचा निर्णय कारखाने आणि शेतक-यांनी सोडवावा. असं सांगून सरकारमधले मंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत.

First Published: Wednesday, November 14, 2012, 16:29


comments powered by Disqus