Last Updated: Sunday, March 24, 2013, 21:24
www.24taas.com, मुंबईराज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले आहेत. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला असून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातील सभांचा आज शेवटचा टप्पा होता. आज सभेपूर्वीच इंडियाबुल्स कंपनीच्या प्रकल्पाल राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. आपल्या जाहीर सभेतही राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सला लक्ष्य केलं होतं. जनतेचं प्यायचं पाणी आणि शेतीसाठी लागणारं पाणी पळवून ते इंडियाबुल्सला पुरवलं जातं, असं राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं होतं. जनतेच्या तोंडचं पाणी पळवून ते ज्या प्रकल्पांना वापरलं जातं, त्या इंडियाबुल्ससारख्या प्रकल्पांविरोधात उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यांचे पडसाद मुंबईत ताबडतोब उमटल्याचं दिसून आलं आहे. काही अज्ञात इसमांनी कार्यकर्त्यांनी परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. १० ते १२ जणांनी हा हल्ला केला आहे. हे कार्यकर्ते मनसेचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
First Published: Sunday, March 24, 2013, 21:24