Last Updated: Sunday, January 8, 2012, 20:54
www.24taas.com, ठाणे 
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील या पितापुत्रांसह माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मनमानी कारभार आणि पक्षातील अंतर्गत राजकारणावर नाराज होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पक्षात योग्य स्थान मिळत नसल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा हादरा असल्याचं बोललं जातं आहे.
निवडणुकीआधी अनेक राजकिय इच्छाशक्ती असणारे बंडखोर अनेक पक्षातून बंडखोरी करून येत असतात त्यामुळे आता यापुढे जसं जस निवडणुकीचा रंग चढू लागेल तसतसे अनेक बंडखोर बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
First Published: Sunday, January 8, 2012, 20:54