मिस इंडियाची `फौज`...
यंदाचा मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर करणारी नवनीत कौर ही मूळची पंजाबची... आत्तापर्यंत या स्पर्धेत वर्चस्व गाजवलंय ते सैनिकी परिवारातून आलेल्य मुलींनी... एक नजर टाकुयात याच काही ओळखीच्या चेहऱ्यांवर...
नवनीत कौर ढिल्लन
पटीयालामध्ये राहणारी नवनीत कौर ढिल्लन हिनं मिस इंडिया २०१३ चा ताजची शान वाढवलीय. नवनीत कौर ही सैनिकी परिवारातून आलीय. नवनीतचे वडील एक आर्मी ऑफीसर आहेत. नवनीतचं शिक्षणही एका आर्मी शाळेत झालंय.
सुष्मिता सेन
मिस इंडिया स्पर्धेत विजेत्या आणि उप-विजेत्या ठरलेल्या अनेक स्पर्धक तरुणी या लष्करी परिवारातून आलेल्या आहेत. त्यापैकीच एक आहे सुष्मिता सेन. सुष्मितानं १९९४ साली मिस इंडियाचा ताज पटकावला होता.
गुल पनाग
१९९९ मध्ये गुल पनाग हिनं मिस इंडयाचा किताब आपल्या नावावर नोंदवला होता. गुलचे वडील थल सेनेत ऑफिसर पदावर कार्यरत होते. गुलच्या म्हणण्यानुसार, सतत बदली होत असल्यानं लष्करी परिवारातून आलेल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास दिसून येतो.
लारा दत्ता
टेनिस खेळाडू महेश भूपती याची पत्नी लारा दत्ता हिनं २००० मध्ये मिस इंडियाच किताब पटकावला होता. लारा मूळची बंगळुरूची... लाराचे वडीलच नाही तर मोठी बहिणदेखील भारतीय सेनेचा एक हिस्सा आहेत.
सेलिना जेटली
२००१ साली मिस इंडियाचा ताज मिळवणारी सेलिना जेटली हीदेखील एका कर्नलची मुलगी... सेलिनाचा जन्म काबुलमध्ये झाला होता. सेलिनाची आईदेखील आर्मीमध्ये नर्स म्हणून काम करत होती.
नेहा धुपिया
पुढच्याच वर्षी म्हणजे २००२ साली मिस इंडियाचा मुकूट पटकावला तो पुन्हा एकदा सैनिकी परिवारातून आलेल्या मुलीनंच... ही मुलगी म्हणजे नेहा धुपिया... नेहाचे वडील भारतीय नौसेनेत कार्यरत होते.
/marathi/slideshow/कुठून-येतात-मिस-इंडिया_212.html