सेनेला टोला
राज ठाकरे शिवसेनेला टाळी देणार की टाळणार या प्रश्नाला राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उत्तर दिलं. आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही. एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या टाळीला टोला लगावला.
परप्रांतीयांवर प्रहार
महाराष्ट्रात मराठी माणसांनाच नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह धरत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला. हिंदी आणि उर्दू भाषांमधून परीक्षा घेण्याच्या सरकारी जीआरचा दाखला देत राज ठाकरेंनी मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचं म्हटलं.
नेत्यांची खिल्ली
जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या आश्चर्याच्या भावांबद्दल त्यांची खिल्ली उडवली. अजित पवारांची नक्कल करत आपल्याला जमिनीतलं काय कळतं यावर राज ठाकरे बोलले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही राज ठाकरेंनी टर्र उडवली. राहुल गांधी टेंपो धुवत असल्याप्रमाणे हातवारे करतात असं राज म्हणाले, तर मनमोहन सिंग चावीवर चालत असल्यासारखेच वाटतात, असंही राज यांनी त्यांची खिल्ली उडवताना म्हटलं.
आर आर पाटील यांना जाहीर आव्हान
गृहमंत्री आर आर पाटील यांना जाहीर आव्हान देत पुन्हा आमची शाखा निर्माण होताना कार्यकर्त्यांना जर आडवलंत, तर तिथल्या तिथे गाडून टाकू असाइशारा दिला. आमच्या शाखा, कार्यालये निर्माण करताना आडवे याल, त्यांच्या घरच्यांनाही धमक्या जातील, हे याद राखा.
स्मारकं कशासाठी?
स्मारकांवर होणारा खर्च सांगत शिवाजी महाराजांचं समुद्रात स्मारक बांधण्यापेक्षा महाराजांचे दुर्लक्षित गड-किल्ले यांच्यावर खर्च करून त्यांची डागडुजी करा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. आपल्या किल्ल्यांमधून उभ्या जगाला कळू दे की आपले शिवाजी महाराज कसे होते ते... असंही राज ठाकरे म्हणाले.
टोल आंदोलन
आपल्या टोलनाका विरोधातील आंदोलनामुळे छगन भुजबळ यांना अखेर राज्यातील ६५ टोल नाके बंद करावे लागले, असं राज पल्या भाषणात म्हणाले. खळ्ळ खट्टॅक हेच आपल्या पक्षाच ब्रीद वाक्य असून आम्ही लहान आंदोलनं करत बसत नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
/marathi/slideshow/राज-ठाकरे-कोल्हापुरात_190.html