Last Updated: Saturday, October 15, 2011, 15:44
इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली. इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.