Last Updated: Saturday, January 26, 2013, 08:53
लतादींदीचा हृदयाला भिडणारा स्वर, कवि प्रदीप यांच्या लेखणीतून उमटलेले अन् मनाचा ठाव घेणारे शब्द आणि संगीतकार सी रामचंद्र यांची तालबद्ध चाल... तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बोलतोय ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताबद्दल... प्रत्येक देशवासीयाला स्फूर्तीदायी ठरणाऱ्या या अनोख्या गीताला आज तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.