Last Updated: Friday, July 20, 2012, 20:58
पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने संप अखेर मागे घेण्यात आलाय. डीआरएमच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामध्ये मोटरमनच्या काही मागण्यांवर विचार करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चार तास मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प. रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्टेशनांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.