Last Updated: Tuesday, May 15, 2012, 12:49
सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अनेक समस्यांचे भीषण वास्तव्य आत्ता समोर येत आहे.' जत ' तालुक्यातील ' करेवाडी ' गावातील लोक मागील बारा वर्षापासून रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील ऐंशी टक्के लोकांना रेशनकार्डच देण्यात आली नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथील दुष्काळ ग्रस्तांची पाणी आणि चाऱ्या बरोबरच आत्ता अन्न धान्यासाठी परवड सुरु आहे.