Last Updated: Saturday, December 14, 2013, 15:24
दिल्लीत सत्तास्थापनेचा घोळ सुरूच आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी नायब राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राजनाथ सिंह यांना पत्र पाठवलंय. या पत्रात त्यांनी काँग्रेस आणि भाजपपुढे १८ अटी ठेवल्यात. देशात प्रथमच या मुद्द्यांच्या आधारावर सरकार बनेल असं सांगताना केजरीवाल यांनी काँग्रेससह भाजपवर टीकास्त्र सोडलंय.