टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

Last Updated: Friday, August 24, 2012, 18:41

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.

भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा

Last Updated: Friday, August 24, 2012, 15:31

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हैदराबादमधील पहिल्या टेस्टमध्ये आज दुसऱ्या दिवशी चहापानापूर्वी भारताचा पहिला डाव ४३८ धावांवर संपला. चेतेश्वर पुजारा, धोनी आणि कोहली यांच्या धमाकेदार खेळामुळेच भारताला चारशेचा टप्पा ओलांडता आला. चेतेश्वर पुजाराने केलेल्या १५९ धावांचा यात मोलाचा वाटा आहे.