बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:58

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

कांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:57

कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.