Last Updated: Tuesday, December 24, 2013, 17:42
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.