पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम

Last Updated: Monday, August 27, 2012, 22:26

पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.

कोळसा खाण घोटाळा : टूजी पेक्षाही भयंकर!

Last Updated: Friday, August 17, 2012, 15:01

कोळसा खाणींच्या लिलावात सरकारचं तब्बल १.८६ लाख करोड रुपयांचं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हा घोटाळा टू जी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरलाय.