आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

Last Updated: Saturday, December 21, 2013, 19:30

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

पाणी व्यवस्थापनातून वाचवलं केळीचं पीक

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:38

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.

धुळ्यातील पीकपाणी

Last Updated: Thursday, August 16, 2012, 08:30

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:21

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.