काळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!

Last Updated: Friday, December 13, 2013, 15:56

वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.