Last Updated: Thursday, March 6, 2014, 17:49
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. पाच जण एकत्र आले म्हणून पांडव बनत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. सत्तेपासून बाहेर गेल्यानं विरोधकांची बडबड सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.