Last Updated: Saturday, October 26, 2013, 20:45
राष्ट्रवादी आणि वादग्रस्त विधानं हे आता समिकरण बनलं आहे. या पूर्वी अजित पवारांनी धरणात पाणी नाही तर लघुशंका करू का असे वादग्रस्त विधान केले होते. आता नेहमी आपला आक्रमक बाणा दाखविण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.