नेमकं काय हवंय शरद पवारांना...

Last Updated: Friday, July 20, 2012, 21:29

आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.

देशाची सुरक्षा धोक्यात- लष्करप्रमुख

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:38

लष्कर प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हे विधान करुन खळबळ उडवून दिली असतानाच त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरुन गदारोळ माजला आहे. देशाचं संरक्षण करण्यास आपण सज्ज नसल्याचं त्यांनी पत्रात लिहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केला आहे. हवाई दलाकडे असलेली ९७ टक्के शस्त्रअस्त्रा निकामी असल्याचं तसंच रणगाड्यांमध्ये दारुगोळा नसल्याचं आणि इनफ्रंट्रीला आवश्यक असणारी शस्त्र उपलब्ध नसल्याचं लष्कर प्रमुखांनी पत्रात लिहिल्याने खळबळ उडाली आहे.