मतदार यादी घोळ : बिग बी नाराज, षडयंत्राचा आरोप

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:35

मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

Last Updated: Thursday, April 10, 2014, 19:33

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.