दुष्काळग्रस्तांसमोर कासारे गावाचा आदर्श

Last Updated: Saturday, May 26, 2012, 08:06

दुष्काळात होरपळणा-या राज्यातल्या शेकडो गावांसाठी अहमदनगरच्या कासारे गावानं आदर्श निर्माण केलाय. जलव्यवस्थापनाच्या जोरावर या गावानं पाणीटंचाईवर मात केलीये. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती सुरु असताना कासारे गाव 'सुजलाम सुफलाम' आहे.