Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:49
सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा...
सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.