Last Updated: Tuesday, February 19, 2013, 12:51
टीम अण्णातील माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असं विधान स्वामी अग्निवेश यांनी केलंय.