Last Updated: Monday, November 7, 2011, 16:24
ऊस दरावरुन राजकारण चांगलचं पेटलं आहे. 2350 रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत दाखल झाली. तोडगा निघेपर्यंत मागे न हटण्याचं त्यांनी ठरवलं. तर सरकार 1450 रुपयांचा पहिला हप्ता देण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात सावध भूमिका घेतली.