Last Updated: Thursday, October 18, 2012, 14:29
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.