आजपासून टोल भरू नका, राज ठाकरेंचं आवाहन

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 12:01

नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.