टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

Last Updated: Friday, October 18, 2013, 08:10

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:01

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.