Last Updated: Monday, January 14, 2013, 09:07
पाकिस्तानने कुरापती काढणे सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी दोनदा शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय चौक्यांववर गोळीबार केला. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय आहे. यामुळे सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरची पूँच विभागात बैठक होणार आहे.