Last Updated: Saturday, August 4, 2012, 23:02
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे साता-यात एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते माणसाच्या जीवावर बेतले आहे.