Last Updated: Sunday, April 13, 2014, 12:26
काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.