मुंबई पोलिसांची `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` योजना

Last Updated: Sunday, March 9, 2014, 16:39

महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.

महिलांनो तुमच्यासाठी, नाशिक पोलिसांचा विशेष उपक्रम

Last Updated: Monday, December 16, 2013, 20:21

दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.

थांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 13:46

सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.

‘बी स्मार्ट, बी सेफ’, महिला सुरक्षेसाठी नवं अॅप!

Last Updated: Monday, October 21, 2013, 09:14

महिलांवरील वाढते अत्याचार पाहता एका आयटी कंपनीनं सुरक्षेसाठी स्मार्ट अॅप्लिकेशन तयार केलंय. यामुळं हल्ला झाल्यास पुरावा मिळवण्यात मदत होणारेय. सायरन वाजून ठिकाण, फोटो, आवाजाचं चित्रिकरण या अॅप्लिकेशनद्वारं केलं जातं.

हेमा मालिनी म्हणाल्या, एकट्या घराबाहेर पडूच नका!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 11:25

रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.

महिलांच्या सुरक्षितेसाठी ICE सॉफ्टवेअर

Last Updated: Sunday, March 17, 2013, 15:12

ICE हे सॉफ्टवेअर महिलांनी जास्तीत जास्त डाऊनलोड कराव, यासठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरा, मात्र हे सॉफ्टवेअर किती महिलांनी डाऊनलोड केलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं सांगितलंय खुद्द मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी.त्यामुळे मुंबई पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी खरंच संवेदनशील आहेत का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

शिवसेनेने वाटले महिलांना चाकू आणि मिरचीची पूड

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 22:19

महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.