मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:13

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.