Last Updated: Monday, June 17, 2013, 07:35
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यातच दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर शाळांमध्ये प्रथमच येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सरकारने फूल देऊन स्वागत करण्याच्या सूचना केल्यात. तर काही शाळांत शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचा बेत आखण्यात आला आहे.