टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना - Marathi News 24taas.com

टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना

www.24taas.com, पल्लेकल्ले
वनडे सीरिज 4-1नं जिंकल्यानंतर आता टीम इंडिया लंका दौ-यातील एकमेव टी-20 मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
 
पल्लेकल्लेला होणा-या या टी-20त लंकन टीम वनडेत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यास आतूर असणार आहे.  सध्याचा टीम इंडियाचा फॉर्म बघता श्रीलंकेला टीम इंडियाचा विजयरथ रोखण्यासाठी काहीतरी चमत्कारच करावा लागला आहे.  तर टीम इंडिया या शेवटची मॅच जिंकून नव्या सीझनच्या पहिल्या दौ-याचा शेवटही विजयाने करण्यास सज्ज आहे.
 
सध्या गौतम गंभीर, विराट कोहली, रैना आणि कर्णधार धोनी चांगलेच फॉर्मात आहेत. तर गोलंदाजीत इरफान पठाणने आपली कमाल दाखवली आहे.

First Published: Wednesday, August 8, 2012, 22:54


comments powered by Disqus